श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी
(प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)२२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. “मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
"अशक्य ही शक्य करतील स्वामी"


अक्कलकोट राजवाडा ऐतिहासिक वारसा
अक्कलकोट राजवाडा हा ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे, जी अक्कलकोट संस्थानच्या राजवटीदरम्यान उभी राहिली. सुंदर दगडी बांधकाम, सुबक कोरीव काम, आणि प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून हा राजवाडा ओळखला जातो. राजवाड्याच्या परिसरात तत्कालीन राजेशाही जीवनशैलीचे दर्शन घडवणाऱ्या वस्तू आणि छायाचित्रे पाहायला मिळतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्थानाच्या जवळ असल्याने राजवाड्याला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. हा राजवाडा इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक आकर्षण केंद्र आहे.
अक्कलकोटजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

श्री राम भक्त निवास

श्री स्वामी समर्थ संग्रहालय

अक्कलकोट राजवाडा

श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर

श्री स्वामी समर्थ उद्यान
